अघोरी हिरावट (Aghori Hiravat)
Narayan Dharap
ऊन उतरलं, वाड्यावर सावल्या सरकायला लागल्या की त्याला स्वैर, मुक्त असं वाटायला लागे. अंधाराची कड जशी वर वर सरके तसा तो वर वर येई... मग शेवटी सर्व वाडाच अंधाराच्या आवरणाखाली गेला की त्याचा सर्वत्र मुक्त संचार सुरू होई. बंद दारं आणि लावलेल्या खिडक्या त्याला कोणत्याच खोलीच्या आत किंवा बाहेर ठेवू शकत नसत. त्याला जडपणा नव्हता, द्रव्य नव्हतं, आकार नव्हता. तो म्हणजे एका जुन्या अस्मितेचा एक अस्पष्ट आविष्कार होता. त्याच्या आकलनापलीकडे असलेल्या नियमांनी त्या वास्तूत बंदिस्त झालेला. आपल्या अस्तित्वाचा हेतू त्याला माहीत नव्हता; तशाच त्याच्या इतर सर्व क्रियाही यांत्रिक, निर्बुद्धपणे केलेल्या होत्या. आपण काही विशिष्ट आकारच का धारण करू शकतो, आपण काही हालचालींचीच तेवढी पुनरावृत्ती का करतो हे त्याला माहीत नव्हतं. किंबहुना त्याला काहीच माहीत नव्हतं.
कितीतरी दशकांपूर्वी ते भीषण नाट्य घडलं होतं. चार दरोडेखोरांनी वाड्यावर घातलेला दरोडा. वाड्यावर पाळत ठेवली होती. पुरुषमाणसं वाडीवर गेल्याची संधी साधली होती. आणि दरोडेखोरांपैकी एक वाड्याच्या मालकाच्या सुनेच्या रूपावर भाळला नसता तर ते सर्व पसार झाले असते, कारण वाड्यात फक्त बायकामाणसं आणि एक-दोघं म्हातारे होते. पण तो एकजण कामवासनेने पेटला, तिच्या पाठलागावर गेला. ज्या खोलीत तिने स्वत:ला कोंडून घेतलं होतं त्या खोलीचं दार फोडण्यात काही वेळ गेला. तो खोलीत शिरून तिच्या शरीराशी झोंबाझोंबी करायला लागला, तोच त्या चौघांच्या दुर्दैवाने पुरुषमंडळी वाडीहून परत आली. बाकीचे तिघे दरोडेखोर लूट तशीच टाकून निसटले. हा एक- नाव लक्षा- मात्र त्यांच्या हाती सापडला. त्याच्या अक्षम्य अपराधाला मृत्यूखेरीज दुसरी शिक्षाच नव्हती. त्याच्या विनवण्या, त्याचं रडणं-भेकणं, त्याच्या किंचाळया सर्व बहिया कानांवर पडत होत्या. त्याला मृत्यू आला तो कणाकणानं आला. हाडांचा भुगा झाला, स्नायू पिंजले गेले, शरीरातली नसन् नस पिरगाळली गेली... त्याचा निर्जीव देह त्यांनी वाड्याबाहेर फेकून दिला तेव्हाच कोठे त्यांच्या डोळ्यांवरचा खून उतरला... ज्या वेदनेत लक्षाला मरण आलं त्याच वेदनेच्या कोषात त्याचा आत्मा अडकला होता. तीव्रतेची परिसीमा गाठलेल्या अंतिम क्षणीच्या या भावना- त्यांच्याच पिंजऱ्यात तो कायमचा अडकून राहिला होता. पण त्याला काहीच माहीत नव्हतं. केवळ आपला…
कितीतरी दशकांपूर्वी ते भीषण नाट्य घडलं होतं. चार दरोडेखोरांनी वाड्यावर घातलेला दरोडा. वाड्यावर पाळत ठेवली होती. पुरुषमाणसं वाडीवर गेल्याची संधी साधली होती. आणि दरोडेखोरांपैकी एक वाड्याच्या मालकाच्या सुनेच्या रूपावर भाळला नसता तर ते सर्व पसार झाले असते, कारण वाड्यात फक्त बायकामाणसं आणि एक-दोघं म्हातारे होते. पण तो एकजण कामवासनेने पेटला, तिच्या पाठलागावर गेला. ज्या खोलीत तिने स्वत:ला कोंडून घेतलं होतं त्या खोलीचं दार फोडण्यात काही वेळ गेला. तो खोलीत शिरून तिच्या शरीराशी झोंबाझोंबी करायला लागला, तोच त्या चौघांच्या दुर्दैवाने पुरुषमंडळी वाडीहून परत आली. बाकीचे तिघे दरोडेखोर लूट तशीच टाकून निसटले. हा एक- नाव लक्षा- मात्र त्यांच्या हाती सापडला. त्याच्या अक्षम्य अपराधाला मृत्यूखेरीज दुसरी शिक्षाच नव्हती. त्याच्या विनवण्या, त्याचं रडणं-भेकणं, त्याच्या किंचाळया सर्व बहिया कानांवर पडत होत्या. त्याला मृत्यू आला तो कणाकणानं आला. हाडांचा भुगा झाला, स्नायू पिंजले गेले, शरीरातली नसन् नस पिरगाळली गेली... त्याचा निर्जीव देह त्यांनी वाड्याबाहेर फेकून दिला तेव्हाच कोठे त्यांच्या डोळ्यांवरचा खून उतरला... ज्या वेदनेत लक्षाला मरण आलं त्याच वेदनेच्या कोषात त्याचा आत्मा अडकला होता. तीव्रतेची परिसीमा गाठलेल्या अंतिम क्षणीच्या या भावना- त्यांच्याच पिंजऱ्यात तो कायमचा अडकून राहिला होता. पण त्याला काहीच माहीत नव्हतं. केवळ आपला…
Categorie:
Anno:
2020
Casa editrice:
Saket Prakashan Pvt. Ltd, India
Lingua:
marathi
ISBN:
B088X4K8X5
File:
EPUB, 1.80 MB
IPFS:
,
marathi, 2020